Breaking : bolt
राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुण्यातील हवेली तहसीलदारांना शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी निवेदनराष्ट्रीय समाज पक्षाकडून कोकण विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी 5 जिल्ह्यातील तहसीलदारांना निवेदनबाळाचा मृतदेह पिशवीत घालून घरी नेण्याची वेळ, आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावरबच्चूभाऊंच्या आंदोलनाला राष्ट्रानायक महादेवजी जानकर यांचा पाठींबाप्राथमिक शिक्षणची ८ कोटींची निविदा ‘कमिशनचा कॉरिडॉर’ होऊ नये, पारदर्शक्तेसाठी रासपतर्फे निवेदनसिंधुदुर्ग जिल्ह्यात 'मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्मक्रम' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभजलजीवन मिशन अंतर्गत कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावाकोल्हापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत 100 दिवसांच्या प्राधान्य कृती कार्यक्रमाचा आढावाजबरी चोरीचे ५ गुन्हे व मोपेड चोरीचा १ गुन्हा केलेल्या अंतरराज्य चोरट्यास अटक

जाहिरात

 

जिल्हा आरोग्य विभागातील बदलीचे राजकारण देणगीदारांच्या मुळावर, झारीतील शुक्राचार्य कोण ?

schedule29 Feb 24 person by visibility 350 categoryइतर

सुशांत पोवार (कोल्हापूर) - कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग गेले महिनाभर अनेक बातम्यांनी चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले तर देणगीतून आलेल्या औषध वितारणामध्ये असे बदनाम झाले की त्यातून मोठा गैरव्यवहार झाला की असेच वाचकांना वाटू लागले त्यामूळे ह्या प्रकरणाची सत्य आणि वस्तुनिष्ठता वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष वृत्तमालिका प्रकाशित करत आहोत......
           जिल्हा परिषदेतील तत्कालीन भांडार विभाग प्रमुख औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले यांनी कफ सिरप ची मागणी लक्षात घेऊन ज्या संस्थेकडून कफ सिरफ देणगी स्वरूपात घेतले त्या संस्थेने या व्यवहारात किती रुपयांचा व्यवहार केला ? कारण देणगी दिले तर व्यवहार नेमका कोणत्या स्वरूपात झाला आणि व्यवहार झाला नसेल तर भ्रष्टाचार नेमका किती रुपयांचा झाला ? तसेच आलेले कफ सिरपचे जार आवक जावक रजिस्टरला नोंदीत एकही जारची कमतरता नसेल आणि आले तितकेच प्राथमिक आरोग्य केंद्राला गेले तर औषध वितरणात अनियमितता कोणती झाली ? ह्याचे विश्लेषण केले तर असे लक्षात येते ज्या संस्थेने देणगी स्वरूपात कफ सिरपचे जार दिले त्यांना पोहोच स्वरूपात बॉटलमध्ये लेखी पोहोच दिल्याने सदर प्रकरण तापले परंतु ह्या आरोप प्रत्यारोपमुळे देणगीदार बदनाम होतोय त्याकडे कोण लक्ष देणार ? ह्या देणगीदारांनी जर आरोग्य विभागाकडे पाठ फिरवली तर नक्कीच औषधांचा तुटवठा जो भरून काढला जात होता तो भविष्यात न भरून येणारे नुकसान करू शकतो याकडे जिल्हा परिषद लक्ष देणार आहे का ? तसेच औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले यांच्यावर कोरोना काळात झालेले आरोप आणि त्याची सत्यता याविषयीची मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेली न्यायालयीन लढाई पाहिली असता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हेच पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना सत्य व वस्तुनिष्ठ माहिती देऊ शकतात परंतु ते न झाल्याने अनेक तर्क वितर्काना उधाण येऊन शेवटी बदनाम झाला तो आरोग्य विभाग, काम करणारे अधिकारी आणि देणगीदार पण हे वेळीच थांबले नाही आणि हे राजकारण करणाऱ्या व्यक्तीला वेळीच थांबविले नाही तर हे नुकसान कधीही न भरून येणारेच ठरेल....
क्रमशः
उद्याच्या वृत्तमालिकेत वाचा
प्रयोगशाळा साहित्य खरेदी टेंडरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes