Breaking : bolt
राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुण्यातील हवेली तहसीलदारांना शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी निवेदनराष्ट्रीय समाज पक्षाकडून कोकण विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी 5 जिल्ह्यातील तहसीलदारांना निवेदनबाळाचा मृतदेह पिशवीत घालून घरी नेण्याची वेळ, आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावरबच्चूभाऊंच्या आंदोलनाला राष्ट्रानायक महादेवजी जानकर यांचा पाठींबाप्राथमिक शिक्षणची ८ कोटींची निविदा ‘कमिशनचा कॉरिडॉर’ होऊ नये, पारदर्शक्तेसाठी रासपतर्फे निवेदनसिंधुदुर्ग जिल्ह्यात 'मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्मक्रम' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभजलजीवन मिशन अंतर्गत कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावाकोल्हापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत 100 दिवसांच्या प्राधान्य कृती कार्यक्रमाचा आढावाजबरी चोरीचे ५ गुन्हे व मोपेड चोरीचा १ गुन्हा केलेल्या अंतरराज्य चोरट्यास अटक

जाहिरात

 

राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुण्यातील हवेली तहसीलदारांना शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी निवेदन

schedule16 Jun 25 person by visibility 83 categoryपुणे

आकाश भारतीय (पुणे) - राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज पुणे जिल्ह्यातील हवेली येथील तहसीलदारांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनामार्फत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. शेतकरी हा देशाचा कणा असून, सततच्या नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ व बाजारातील मंदीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळावा यासाठी ही मागणी करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विनायक रूपनवार यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यकारणी सदस्य बाळासाहेब कोकरे, वैशाली जाधव, संजय माने पाटील, बालाजी पवार, मनोज महांगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
       निवेदनामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड मोठ्या संकटाला सामोरे जात असताना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यापेक्षा शेतमजुराचे उत्पन्न जास्तीचे आहे. शेती करणे नुकसानीचे बनले आहे. अहवालानुसार दिवसाला आठ शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे. अशा काळात राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते की, आमचे सरकार आल्यास शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार आज हे धाडस दाखवण्याची वेळ आली आहे. आज तहसीलदारसो यांच्यामार्फत आम्ही शासनाला कळवीत आहे. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी करत सातबारा कोरा करावा अशी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून मागणी करीत आहे याची नोंद शासनाने घ्यावी ,अन्यथा   लवकरच  तीव्र आंदोलन छेडले जाईल. असे नमूद केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes