Breaking : bolt
राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुण्यातील हवेली तहसीलदारांना शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी निवेदनराष्ट्रीय समाज पक्षाकडून कोकण विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी 5 जिल्ह्यातील तहसीलदारांना निवेदनबाळाचा मृतदेह पिशवीत घालून घरी नेण्याची वेळ, आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावरबच्चूभाऊंच्या आंदोलनाला राष्ट्रानायक महादेवजी जानकर यांचा पाठींबाप्राथमिक शिक्षणची ८ कोटींची निविदा ‘कमिशनचा कॉरिडॉर’ होऊ नये, पारदर्शक्तेसाठी रासपतर्फे निवेदनसिंधुदुर्ग जिल्ह्यात 'मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्मक्रम' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभजलजीवन मिशन अंतर्गत कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावाकोल्हापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत 100 दिवसांच्या प्राधान्य कृती कार्यक्रमाचा आढावाजबरी चोरीचे ५ गुन्हे व मोपेड चोरीचा १ गुन्हा केलेल्या अंतरराज्य चोरट्यास अटक

जाहिरात

 

बाळाचा मृतदेह पिशवीत घालून घरी नेण्याची वेळ, आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर

schedule16 Jun 25 person by visibility 113 categoryमहाराष्ट्र

आकाश भारतीय (विशेष वृत्त) - "नाशिकच्या डॉक्टरांनी ऑपरेशन करून बायकोला वाचवलं आणि माझं मेलेलं बाळ हातात दिलं. गाडीला पैसे नव्हते म्हणून ते बाळ परकरमध्ये गुंडाळलं, पिशवीत घातलं आणि एसटीने गावाकडं निघून आलो. कुणी गाडी विचारली नाही, कुणी मेलेल्या बाळाबद्दल चौकशी केली नाही. काहीच नाही..."मृत बाळाच्या वडिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
               पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यात जोगलवाडी नावाचं एक गाव आहे. या गावात सखाराम आणि अविता कवर राहतात. प्रगत राज्य म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी ११ जूनच्या पहाटेपासून पुढचे दोन दिवस सखाराम आणि अविता यांच्यासोबत नेमकं काय घडलं हे जाणून घेतलंच पाहिजे. वीटभट्टीवर मजुरी करणारं हे कातकरी आदिवासी समाजाचं जोडपं त्यांच्या बाळाला जन्म देणार होतं. २६ वर्षांच्या अविता गर्भवती होत्या. ११ जूनच्या पहाटे अचानक त्यांच्या पोटात दुखायला लागलं. त्यानंतर घडलेला घटनाक्रम कुणाही संवेदनशील व्यक्तीला हादरवून सोडणारा आहे. आणि तेही मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरापासून शे-दोनशे किलोमीटरच्या अंतरावरील.
              पालघर जिल्ह्यातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, पाणीटंचाई अशा समस्यांच्या दरवर्षी प्रकाशित होत असतात. मात्र, एवढी वर्षं या प्रश्नांचं वार्तांकन होऊनही या भागात काहीच बदललं नसल्याचं सध्या दिसून येतंय.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes