Breaking : bolt
राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुण्यातील हवेली तहसीलदारांना शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी निवेदनराष्ट्रीय समाज पक्षाकडून कोकण विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीसाठी 5 जिल्ह्यातील तहसीलदारांना निवेदनबाळाचा मृतदेह पिशवीत घालून घरी नेण्याची वेळ, आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावरबच्चूभाऊंच्या आंदोलनाला राष्ट्रानायक महादेवजी जानकर यांचा पाठींबाप्राथमिक शिक्षणची ८ कोटींची निविदा ‘कमिशनचा कॉरिडॉर’ होऊ नये, पारदर्शक्तेसाठी रासपतर्फे निवेदनसिंधुदुर्ग जिल्ह्यात 'मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्मक्रम' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभजलजीवन मिशन अंतर्गत कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावाकोल्हापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत 100 दिवसांच्या प्राधान्य कृती कार्यक्रमाचा आढावाजबरी चोरीचे ५ गुन्हे व मोपेड चोरीचा १ गुन्हा केलेल्या अंतरराज्य चोरट्यास अटक

जाहिरात

 

“महाराष्ट्रात आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही” - बच्चू कडू

schedule21 Nov 24 person by visibility 587 categoryराजकीय घडामोडी

वृत्तसंस्था - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे मतदान नुकतंच पार पडले. यंदाच्या निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळाली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या मतदानानंतर आता महाराष्ट्रातील एक्झिट पोल समोर आले. टीव्ही 9 रिपोर्टरच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकासआघाडीला 136-145 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर इतर आणि अपक्ष यांना 13 ते 23 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. त्यातच आता प्रहार जनशक्‍ती पक्षाचे नेते बच्‍चू कडू यांनी एक मोठा दावा केला आहे. “महाराष्ट्रात आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही”, असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे.

                       बच्चू कडू यांनी नुकतंच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालासंदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी “प्रहार जनशक्‍ती पक्षाचे १५ आमदार निवडून येणार आहे. त्यासोबतच अनेक अपक्ष आमदारांच्याही आम्ही संपर्कात आहोत. त्यामुळे आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही”, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. “माझ्या मतदारसंघात भाजपने अतिशय खालच्या पातळीवर राजकारण केले आहे. काँग्रेस आणि भाजप हे संभ्रमात आहे. मात्र माझा विजय हा निश्चित होणार आहे. राज्यात आम्हीच सत्ता स्थापन करणार आहे, हे सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे. आम्ही सत्ता स्थापन करु आणि एखाद्या मोठया पक्षाला आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल. आमच्या शिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही”, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

                  “आमचे 15 आमदार निवडून येणार आहेत. अनेक अपक्ष आमदारांच्या आम्ही संपर्कात आहोत. आम्ही अपक्ष आमदारांची मोठं बांधणी करु. आम्ही कोणाला सोबत घ्यायचं ते आता आम्ही ठरवणार आहे. आम्ही कुणासोबत जाणार हे मोठे पक्ष ठरवू शकत नाही. राज्यातील सरकार अपक्ष आणि लहान पक्ष चालवणार आहे. सरकार आमचं असेल. मोठे पक्ष पाठिंबा देतील. आता मोठ्या पक्षासाठी आमचा फोन नॉट रीचेबल राहील”, असे बच्चू कडूंनी म्हटले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes