Breaking : bolt
पक्षांतर प्रकरणातील न्याय निर्णयांवर ठाकरे गटाचा संतापसुनील तटकरे यांच्या रणनीतीमुळे रायगडमध्ये शिवसेनेला धक्का, राजीव साबळे राष्ट्रवादीत दाखलफडणवीस राज्यपालांची भेट घेऊन नवीन धक्का देण्याच्या तयारीत, राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोड घडते याचे स्पष्ट संकेतबीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरची लाईट गेल्यास रेंज गायबदापोलीतून "एक राखी जवानांसाठी" अभियानाअंतर्गत सीमेवर राख्या रवाना !महाराष्ट्रात निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यामागे राज - उद्धव युतीच्या घबराटीचं सावट ?अंबानींंच्या बदनामीसाठीचं सीईओ कोल्हापुरात, त्यांचा अटीट्युड आणि एवढी पण भीती बरोबर नाही !समृद्धी महामार्गातील हजारो झाडांच्या कत्तलीत लाखो पशु-पक्षी रस्त्यावर आली, तेव्हा "पेटा" कुठे होती ?वैभववाडी येथील राज्य महामार्गावरील चिखलमय खड्ड्यात फुलणार "आंदोलनाची" हिरवीगार झाडेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरोडा येथील विद्युत पोलवर तागंठी तलवार

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत 100 दिवसांच्या प्राधान्य कृती कार्यक्रमाचा आढावा

schedule10 Jun 25 person by visibility 106 categoryकोल्हापूर

दत्तात्रय कदम (कोल्हापूर) - प्रत्येक विभागाने व्यापक दृष्टिकोन अंगीकारून मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान जिल्ह्यात राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात 100 दिवसांचा कृती आराखडा यशस्वीपणे राबविला गेला. त्यानंतर, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान, कोल्हापूर अंतर्गत जिल्ह्यातील शासकीय विभागांसाठी 100 दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रम राबविला जात आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात सर्व विभागप्रमुख आणि तालुका विभागप्रमुख यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

                यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी शरद मगर, अधीक्षक अभियंता (सार्वजनिक बांधकाम) तुषार बुरुड, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्यासह जिल्हास्तरीय सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. तसेच, दूरदृष्यप्रणालीद्वारे तालुका आणि उपविभागीय स्तरावरील सर्व अधिकारी सहभागी झाले.

                सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान या नावाने कृती कार्यक्रम राबविण्यास निश्चित केले आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सकारात्मक आणि प्राधान्याने सहभागी होऊन यशस्वी अंमलबजावणीसाठी सक्रिय योगदान द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या. या अभियानामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण होऊन त्यांचे जीवनमान सुकर होण्यास मदत होईल. अभियानाचा कालावधी 1 मे 2025, महाराष्ट्र दिन ते 15 ऑगस्ट 2025, स्वातंत्र्य दिन असा आहे.

                या बैठकीत जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या अंमलबजावणीसाठी तयार केलेल्या संकेतस्थळ आणि डॅशबोर्डची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली. तसेच, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी शरद मगर यांनी अभियानाची कालबद्ध आणि सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. बैठकीत दोन्ही कृती कार्यक्रमांचे घटक आणि तपशील सांगण्यात आले. तसेच, डॅशबोर्डवर कशाप्रकारे माहिती भरावी याचे प्रात्यक्षिकही देण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes