Breaking : bolt
पक्षांतर प्रकरणातील न्याय निर्णयांवर ठाकरे गटाचा संतापसुनील तटकरे यांच्या रणनीतीमुळे रायगडमध्ये शिवसेनेला धक्का, राजीव साबळे राष्ट्रवादीत दाखलफडणवीस राज्यपालांची भेट घेऊन नवीन धक्का देण्याच्या तयारीत, राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोड घडते याचे स्पष्ट संकेतबीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरची लाईट गेल्यास रेंज गायबदापोलीतून "एक राखी जवानांसाठी" अभियानाअंतर्गत सीमेवर राख्या रवाना !महाराष्ट्रात निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यामागे राज - उद्धव युतीच्या घबराटीचं सावट ?अंबानींंच्या बदनामीसाठीचं सीईओ कोल्हापुरात, त्यांचा अटीट्युड आणि एवढी पण भीती बरोबर नाही !समृद्धी महामार्गातील हजारो झाडांच्या कत्तलीत लाखो पशु-पक्षी रस्त्यावर आली, तेव्हा "पेटा" कुठे होती ?वैभववाडी येथील राज्य महामार्गावरील चिखलमय खड्ड्यात फुलणार "आंदोलनाची" हिरवीगार झाडेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरोडा येथील विद्युत पोलवर तागंठी तलवार

जाहिरात

 

बीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरची लाईट गेल्यास रेंज गायब

schedule03 Aug 25 person by visibility 87 categoryसिंधुदुर्ग

दिनेश मयेकर (सावंतवाडी) - सावंतवाडी तालुक्यातील आजगांव तसेच वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथे बीएसएनएल कंपनीने चार वर्षांपूर्वी मोबाईल टॉवर उभारला होता.त्या टॉवरमुळे गेली तीन-चार वर्षे लाईट गेल्यावर पंचक्रोशीतील गावातील बीएसएनएलची रेंज गायब होते.त्यामुळे "टॉवर लावलाय नावाला  अन् रेंज नाही गावाला" अशी अवस्था आजगांव गावांसह पंचक्रोशीतील गावांमधील मोबाईल धारकांची झाली आहे.

      सद्यस्थितीत मोबाईला वापर खूपच वाढला आहे.मात्र अजूनही ग्रामीण भागांमध्ये नेटवर्क मिळत नसल्याने संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत.नेटवर्क अभावी ऑनलाईन कामांवर त्याचा खुपच मोठा परिणाम होत आहे.त्याचबरोबर परगावी किंवा मुंबई,पुणे शहर व गोवा राज्य सारख्या बाहेरगावी राहत असलेल्या नातेवाईकांना एमरजन्सी फोन करताना बऱ्याच अडचणीचा सामना जनतेला करावा लागतो.संबधित कंपनीने गेली तीन-चार वर्षे ग्राहकांनी तक्रार करून सुद्धा यांची कोणतेही दखल घेतली नसून त्यामुळे जनतेकडून नाराजी व्यक्त होत आहे. तरी संबंधित कंपनीने येत्या एक-दोन अडचण दूर करावी,अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes