Breaking : bolt
गैरप्रकार बाहेर येऊ नये म्हणून लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चार्ज काढून घेतले जातील अशी दबक्या आवाजात चर्चा ? शंका खरी ठरल्यास राज्याचे लक्ष कोल्हापूरवर केंद्रित होण्याची शक्यता...?सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मोठी कारवाई, वरिष्ठ अधिकारी निलंबित....अमराठी औषध पुरवठादारांकडून झटपट पैसे कमविण्याच्या हव्यासापोठी कोल्हापुरचंं आरोग्य बिघडविण्याचा प्रयत्न....राजकीय दबावापोटी मनापाचा जैव वैद्यकीय प्रकल्प बंद पाडून खाजगी प्रकल्प टाकण्याचा डाव अखेर यशस्वी, मनपाच्या उत्पन्नाचा एक स्त्रोत झाला कमीसंस्कृती बचाव मोर्चाने सांगलीतील तीन घराण्यांचे गणित जुळून आले तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकतेकाही नेत्यांच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे जयंत पाटील - बाळासाहेब थोरात ठरले महाराष्ट्रात नंबर एकचे नेते....बनावट औषध पुरवठा प्रकरण बाहेर येऊ नये म्हणूनचंं तर झाले नसेल औषध निर्माण अधिकाऱ्याचंं निलंबन ?गणपती व आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील मानव गवंडी टोळी हद्दपारसंजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर लोखंडे टोळी हद्दपार; सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात २ वर्षे प्रतिबंधितमुल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक, दागिने चोरी करणारा संशयित जेरबंद

जाहिरात

 

बाळाचा मृतदेह पिशवीत घालून घरी नेण्याची वेळ, आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर

schedule16 Jun 25 person by visibility 300 categoryमहाराष्ट्र

आकाश भारतीय (विशेष वृत्त) - "नाशिकच्या डॉक्टरांनी ऑपरेशन करून बायकोला वाचवलं आणि माझं मेलेलं बाळ हातात दिलं. गाडीला पैसे नव्हते म्हणून ते बाळ परकरमध्ये गुंडाळलं, पिशवीत घातलं आणि एसटीने गावाकडं निघून आलो. कुणी गाडी विचारली नाही, कुणी मेलेल्या बाळाबद्दल चौकशी केली नाही. काहीच नाही..."मृत बाळाच्या वडिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
               पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यात जोगलवाडी नावाचं एक गाव आहे. या गावात सखाराम आणि अविता कवर राहतात. प्रगत राज्य म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी ११ जूनच्या पहाटेपासून पुढचे दोन दिवस सखाराम आणि अविता यांच्यासोबत नेमकं काय घडलं हे जाणून घेतलंच पाहिजे. वीटभट्टीवर मजुरी करणारं हे कातकरी आदिवासी समाजाचं जोडपं त्यांच्या बाळाला जन्म देणार होतं. २६ वर्षांच्या अविता गर्भवती होत्या. ११ जूनच्या पहाटे अचानक त्यांच्या पोटात दुखायला लागलं. त्यानंतर घडलेला घटनाक्रम कुणाही संवेदनशील व्यक्तीला हादरवून सोडणारा आहे. आणि तेही मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरापासून शे-दोनशे किलोमीटरच्या अंतरावरील.
              पालघर जिल्ह्यातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, पाणीटंचाई अशा समस्यांच्या दरवर्षी प्रकाशित होत असतात. मात्र, एवढी वर्षं या प्रश्नांचं वार्तांकन होऊनही या भागात काहीच बदललं नसल्याचं सध्या दिसून येतंय.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes