Breaking : bolt
पक्षांतर प्रकरणातील न्याय निर्णयांवर ठाकरे गटाचा संतापसुनील तटकरे यांच्या रणनीतीमुळे रायगडमध्ये शिवसेनेला धक्का, राजीव साबळे राष्ट्रवादीत दाखलफडणवीस राज्यपालांची भेट घेऊन नवीन धक्का देण्याच्या तयारीत, राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठी घडामोड घडते याचे स्पष्ट संकेतबीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरची लाईट गेल्यास रेंज गायबदापोलीतून "एक राखी जवानांसाठी" अभियानाअंतर्गत सीमेवर राख्या रवाना !महाराष्ट्रात निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यामागे राज - उद्धव युतीच्या घबराटीचं सावट ?अंबानींंच्या बदनामीसाठीचं सीईओ कोल्हापुरात, त्यांचा अटीट्युड आणि एवढी पण भीती बरोबर नाही !समृद्धी महामार्गातील हजारो झाडांच्या कत्तलीत लाखो पशु-पक्षी रस्त्यावर आली, तेव्हा "पेटा" कुठे होती ?वैभववाडी येथील राज्य महामार्गावरील चिखलमय खड्ड्यात फुलणार "आंदोलनाची" हिरवीगार झाडेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरोडा येथील विद्युत पोलवर तागंठी तलवार

जाहिरात

 

सामाजिक कार्यकर्ते जयराज कोळी आणि युवराज खराडे यांना खंडणी प्रकरणी अटक

schedule24 Jun 25 person by visibility 70 categoryक्राइम न्यूज

संजय पोवार (वाईकर)  - सामाजिक कार्यकर्त्याच्या मुखवट्याआड खंडणीचा गोरखधंदा करणाऱ्या जयराज कोळीला पोलिसांनी 15 लाखांची खंडणी घेताना रंगेहात अटक केली आहे. औषधी उपकरणांच्या पुरवठादाराकडून खोट्या चौकशी अर्जाच्या आधारे ब्लॅकमेल करून ही रक्कम उकळण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कागल पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जयराज कोळी आणि त्याचा साथीदार युवराज खराडे यांना अटक केली. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, जयराज कोळीने "खंडणी द्या, अन्यथा तुझ्या पत्नीच्या नावाने खोटे चौकशीचे अर्ज टाकून त्रास देण्याची धमकी दिली होती.
           स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता जयराज कोळी यांना 15 लाखाची खंडणी घेताना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. जयराज कोळी बरोबरच त्याचा साथीदार युवराज खराडेला देखील पोलिसांनी अटक केली.औषधी उपकरणे पुरवठा करणाऱ्या एका व्यक्तीला जयराज कोळी चौकशीचे खोटे अर्ज दाखल करून वारंवार त्रास देत होता. यानंतर मी सगळे अर्ज मागे घेतो मात्र 20 लाख रुपये दे अशी मागणी जयराज कोळी यांने केली... शेवटी 15 लाखावर तडजोड झाली आणि कागलच्या लक्ष्मी टेकडीच्या जवळ हे पैसे देण्याचे ठरले. फिर्यादीने आधीच या संदर्भातली माहिती पोलिसांना दिली होती. त्यामुळे सापळा रचून पोलिसांनी जयराज कोळी आणि युवराज खराडेला पकडले. या दोघांवर देखील कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
           सामाजिक कार्याच्या नावाखाली जयराज कोळी याने ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू केला होता. सीपीआर मध्ये माहिती अधिकाराचे अर्ज टाकून संबंधित व्यक्तींना त्रास देत पैशाची मागणी केली जात असे. मात्र या प्रकरणात जयराज कोळी याचे कारनामे समोर आले. जयराज कोळी हा पूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा पदाधिकारी होता.मात्र त्याचे हे कारनामे बघून प्रहार संघटनेमधून त्याचे हकलपट्टी करण्यात आली.
             जयराज कोळीने सामाजिक कार्याचा मुखवटा घालून सीपीआर रुग्णालयासह विविध ठिकाणी माहिती अधिकाराचे (RTI) अर्ज टाकून ब्लॅकमेलिंग सुरू केली होती. त्याच पद्धतीने औषधी उपकरण पुरवठादाराकडून खंडणी मागण्यात आली होती. 15 लाख रुपये रोख स्वरूपात घेताना पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पकडलं. कोळीविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. खंडणी, धमकी आणि खोट्या चौकशांची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार त्याने वेळोवेळी केला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आणखी कोणत्या व्यापाऱ्यांना किंवा व्यक्तींना कोळीने टार्गेट केलं होतं, याची माहिती घेत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes